भारतीय संविधानाचे कलम ५१अ अन्वये प्रत्येक भारतीय हा “राज्यघटना-पाल आणि निसर्ग-पाल ” घोषित

संविधानाने जाहीर केलेले मुलभुत कर्तव्य टाळणाऱ्या व्यक्तीवर किंवा लोकसेवकावर  मुलभुत अधिकार भंगाचा ठपका ठेवणार    –लोकभज्ञाक चळवळ

अहमदनगर – भारतीय संविधानातील तरतुदीनुसार प्रत्येक नागरीकाने कायद्याचे पालन केलेच पाहीजे. त्याशिवाय संविधानाचे कलम ५१अ खाली मुलभुत कर्तव्ये घोषीत आहेत. ही मुलभुत कर्तव्ये करण्यासाठी प्रत्येक भारतीय नागरीकाला राज्यघटना- पाल म्हणून मान्यता आहे. त्याचबरोबर निसर्गाचे संवर्धन करण्याची जबाबदारी प्रत्येक भारतीयावर ठेवण्यात आलेली आहे. ग्लोबल वार्मिंगमुळे संपूर्ण सजीव सृष्टी धोक्यात आली आहे. प्रत्येक भारतीयाने मोठ्या प्रमाणात आपल्या परिसरात वृक्ष लागवड करुन जोपासणा केलीच पाहीजे. त्याशिवाय पर्यावरणाचा प्रश्न सुटणार नाही.

निसर्गाची भक्ती, ग्लोबल वार्मिंग होण्याचे कारण व त्यामागील विज्ञान आणि प्रत्यक्ष पर्यावरणाचे प्रश्न सोडविण्यासाठीचे कार्य यातुन निसर्गभज्ञाक चळवळ व्यापक होत आहे. सर्व देशवाशियांनी मोठया प्रमाणात वृक्ष लागवड करुन जोपासणा केली तर भारत हा ग्लोबल वार्मिंगचा प्रश्न संपविण्याच्या कामी सर्व देशांचा नेता ठरणार आहे. याच कारणासाठी भारतीय संविधानाने प्रत्येक नागरीकाला निसर्ग-पाल ठरविले आहे.

वृक्ष लागवड टाळणाऱ्या तसेच पर्यावरणाचा ऱ्हास घडवून आणणाऱ्या लोकां विरुध्द तसेच लोकसेवकां विरुध्द लोकभज्ञाक चळवळ मुलभुत कर्तव्य भंगाचा जाहीर रितीने ठपका ठेवील. भारतीय राष्ट्रध्वज, तिरंग्याच्या ठिकाणी असणारा केसरी रंग हा लोकभक्ती दर्शवितो, पांढरा रंग ज्ञानभक्ती दर्शवितो तर हिरवा रंग कर्तव्यभक्ती स्पष्ट करतो. पांढऱ्या रंगामध्ये असणारे अशोकचक्र हे कायद्याचे राज्य आणि मध्यम मार्ग स्पष्ट करते. या तिरंग्याचा प्रत्येक भारतीयाला रास्त अभिमान आहे. त्यामुळे प्रत्येक भारतीयाने राज्यघटना-पाल आणि निसर्ग-पाल म्हणुन त्यांच्यावर ठेवलेल्या मुलभुत कर्तव्याची अंमलबजावणी केलीच पाहीजे अशी आग्रही भुमिका लोकभज्ञाक चळवळीने घेतली आहे.


अॅङ कारभारी गवळी, अशोक सब्बन, ओम कदम, प्रकाश थोरात, जालिंदर बोरुडे, शाहीर कान्हु सुंबे, विठठल सुरम इत्यादी कार्यकर्ते लोकभज्ञाक चळवळ व्यापक करण्यासाठी प्रयत्नशिल आहेत.

news portal development company in india
marketmystique