महाराष्ट्रातला एकमेव जायंट किलर

महाराष्ट्रातून लोकसभेच्या निवडणुका लढलेल्या प्रमुख राजकीय पक्षांच्या उमेदवारांच्या आणि निवडून आलेल्या लोकांच्या नावांकडे नजर फिरवली तर यापैकी बहुतेक जण प्रस्थापित आहेत हे सहज लक्षात येते.

बहुतेक उमेदवारांना कौटुंबिक राजकीय वारसा होता.

या नव्या ४८ खासदारांमध्ये केवळ एक जण जायंट किलर ठरला आहे.

हे नवे खासदार आहेत अहमदनगर मतदारसंघात शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे निवडून आलेले निलेश लंके.

पारनेर येथील आमदार म्हणून याआधी निवडून आलेल्या लंके यांनी अहमदनगरचे विद्यमान खासदार डॉ सुजय विखे यांचा अत्यंत अटीतटीच्या लढाईत २९ हजार मतांनी पराभव केला आहे.

राज्यात मंत्री आणि अहमदनगर जिल्ह्यातील एक मोठे राजकीय प्रस्थ असलेल्या राधाकृष्ण विखे यांचे सुजय विखे हे चिरंजीव.

शिर्डी लोकसभा मतदारसंघ आता आरक्षित असल्याने विखे याचे घराणे आपल्याच बालेकिल्ल्यात विस्थापित झाले आहे.

काँग्रेसचे नेते म्हणून महाराष्ट्रात विरोधी पक्षनेते असलेल्या राधाकृष्ण विखे यांनी आपल्या मुलाला अहमदनगर लोकसभा मतदारसंघात 2019 साली काँग्रेसची उमेदवारी मिळावी यासाठी खूप प्रयत्न केले होते.

ते शक्य होईना तेव्हा अखेरीस ते सरळसरळ भाजपात सामिल झाले होते आणि मग भाजपच्या तिकिटावर अहमदनगरमधून डॉ सुजय विखे निवडून आले होते.

यावेळीसुद्धा सुजय विखे यांचा विजयाचा मार्ग खूप सुकर होता, मात्र अचानक निलेश लंके यांची एन्ट्री झाली.

अजित पवार राष्ट्रवादीचे पारनेरचे आमदार असलेल्या लंके यांना पक्षाची उमेदवारी मिळेना तेव्हा त्यांनी आमदारकीचा राजीनामा दिला आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीची उमेदवारी मिळवली.

डिट्टो विखे कुटुंब स्टाईलने.

इतिहासाची पुनरावृत्ती या मतदारसंघात झाली होती.

निलेश लंके यांना फाडफाड इंग्रजी बोलता येत �

news portal development company in india
marketmystique